मा. संजय राठोड यांच्या मातोश्रींच्या प्रेरणेने सुरू झालेली ही योजना ग्रामीण व बंजारा समाजातील नव्या पिढीला शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या संधीसाठी सक्षम करते.
सन २०२४ मध्ये ही योजना प्रथम दिग्रस, दारव्हा व नेर तालुक्यात सुरू करण्यात आली आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी विस्तारित करण्यात आली आहे. पारदर्शक प्रक्रिया व गुणवत्तेच्या आधारे आजपर्यंत सुमारे २०,००० विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली.
बंजारा समाजातील सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी खुली.
शैक्षणिक गुणवत्ता, आर्थिक गरज व सामाजिक भान यांना प्राधान्य.
विद्यार्थ्यांना प्रगती व आत्मविश्वास देणारा उपक्रम.
आता शिष्यवृत्ती योजना संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजासाठी खुली आहे.
निवड प्रक्रियेत गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देऊन योग्य विद्यार्थ्यांची निवड.
पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून थेट आर्थिक सहाय्य.
MPSC/UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी दिशादर्शन व तयारी.
ऑनलाइन नोंदणी, परीक्षा व निकाल — संपूर्ण पारदर्शक प्रणाली.
पात्र विद्यार्थ्यांसाठी नोंदणी खुली आहे. अर्ज भरा आणि संधीचा लाभ घ्या.